गुरुवार, ७ जून, २००७

भीती


stomp, originally uploaded by amrita b.

.
.
अपयश ही एक स्थिती आहे
हे कळले की भीती जाते
अपयशाला वाकुल्या दाखवण्याचे
अंगामधे नवे बळ येते

कितीही विक्राळ दिसला
जरी परिस्थितीचा चेहरा
आपण धरून ठेवायचा असतो
आत्मविश्वासाचा दोरा

अपयश हा एक बागुलबोवा
हे कळणे महत्वाचे
त्यानंतर सारी रात्र
शांत निर्मळ झोप येते

तुषार जोशी, नागपूर

1 टिप्पणी:

  1. अपयश हा एक बागुलबोवा
    हे कळणे महत्वाचे
    त्यानंतर सारी रात्र
    शांत निर्मळ झोप येते


    classss.....

    उत्तर द्याहटवा